पुण्यासह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ !

मुंबई – रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे पुराच्या फटक्यातून सावरत असतांनाच या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ची चेतावणी दिली आहे. ३० जुलै या दिवशी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून तेथे ‘ऑरेंज अलर्ट’ लागू करण्यात आला आहे.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतीवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली; मात्र गेल्या २ दिवसांपासून पाऊस न पडल्याने पुराचे पाणी ओसरत असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. हवामान विभागाने २७ आणि २८ जुलै या दिवशी मुसळधार पाऊस, तर २९ आणि ३० जुलै या दिवशी अतीवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता वर्तवली आहे.
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत