पुण्यासह ६ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ !

मुंबई – रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे पुराच्या फटक्यातून सावरत असतांनाच या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ची चेतावणी दिली आहे. ३० जुलै या दिवशी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून तेथे ‘ऑरेंज अलर्ट’ लागू करण्यात आला आहे.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतीवृष्टीने पूर परिस्थिती निर्माण झाली; मात्र गेल्या २ दिवसांपासून पाऊस न पडल्याने पुराचे पाणी ओसरत असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. हवामान विभागाने २७ आणि २८ जुलै या दिवशी मुसळधार पाऊस, तर २९ आणि ३० जुलै या दिवशी अतीवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता वर्तवली आहे.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन