
मी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘आपण मंदिर बांधायला प्राधान्य का देत नाही ?’, असे विचारले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सध्या देशात अनेक मंदिरे आहेत. मंदिर बांधण्याच्या आधी ‘मंदिरांचे संरक्षण, व्यवस्थापन आणि मंदिर बांधण्याचा उद्देश कसा सफल होईल ?’, हे पाहिले पाहिजे. भक्तांनी मंदिरातील देवाची पूजा आणि व्यवस्थापन पहायला हवे. मंदिरातून लोकांना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरण आणि साधनामार्ग, यांकडे वळवले पाहिजे; परंतु आता तसे होतांना दिसत नाही. पुढे आपत्काळात मंदिराचे व्यवस्थापन आणि त्याचे रक्षण, हे करणारेही कोणी नसतील. तेव्हा सर्व काही आपल्यालाच पहावे लागेल. ते करण्यासाठी, म्हणजेच भक्त होण्यासाठी साधना करावी लागणार आहे.’’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.११.२०१९)
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !