
नागपूर – उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या अधिकोष खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे केवळ १५० रुपयांच्या अनुदानासाठी विद्यार्थ्यांना १ सहस्र रुपयांचे अधिकोष खाते उघडावे लागणार आहे. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने या निर्णयाला पालक आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी विरोध केला आहे.
विविध सरकारी योजना आणि शिष्यवृत्ती घेणार्या विद्यार्थ्यांचे अधिकोष खाते आहे; परंतु हे प्रमाण पुष्कळ अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाचा हा आदेश चुकीचा असल्याचे मत समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. ‘उन्हाळी सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी १५६ रुपये आहे, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी २३४ रुपये ठरणार आहे. त्यामुळे किमान १५० रुपयांच्या निधीसाठी १ सहस्र रुपये भरून बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नाही. त्यामुळे हा निर्णय सरकारने रहित करावा’, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू