भगवान श्रीकृष्ण ‘हिंदु राष्ट्र’ आणेलच !

ईश्वरी योजनेनुसार वर्ष २०२३ मध्ये भारतात ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होणारच आहे. संत आणि द्रष्टेपुरुष यांनाही त्याचे वेध लागले आहेत. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर गोप-गोपींनी ज्याप्रमाणे स्वतःचे कर्तव्य म्हणून त्यांच्या काठ्या गोवर्धन पर्वताला लावल्या, त्याप्रमाणे आपल्यालाही आपले हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कर्तव्य बजावायचे आहे. आपण साधना म्हणून हिंदु राष्ट्रासाठी कार्य केले, तर हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासमवेत स्वतःचाही उद्धार होईल. कालमाहात्म्याप्रमाणे वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. या कालावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी धर्मकार्य केल्यास हिंदु राष्ट्र तर स्थापन होईलच; पण त्यासह प्रत्येकाला साधनेचे फळही मिळेल. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करा ! भगवान श्रीकृष्ण तुम्हाला ‘हिंदु राष्ट्र’ देईलच !

‘हिंदु राष्ट्राची स्थापना हेच आपल्या सर्वांचे ध्येय झाले, तर हिंदु राष्ट्राची पहाट उगवल्याविना रहाणार नाही !’

– परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले