
सातारा – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती अल्प होत आहेत; मात्र भारतामध्ये पेट्रोलचे दर १०० रुपये, तर डिझेलचे ९२ रुपयांपेक्षा अधिक आहेत. स्वयंपाकाचा गॅस ९०० रुपयांच्या घरात गेला आहे. मोदी सरकारची ही ‘दरवाढ’ नसून ‘करवाढ’ आहे. इंधन दरवाढीच्या माध्यमातून सरकार सामान्य जनतेकडून जिझिया कर वसूल करत आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
आमदार चव्हाण पुढे म्हणाले, महागाई अशीच वाढत राहिली, तर जनतेचे जगणे कठीण होईल. कोरोनामुळे जनता अगोदरच त्रस्त झाली आहे. त्यातच महागाई वाढ आहे. काँग्रेस शासनाच्या काळात कच्च्या तेलाच्या किंमती वाढूनही तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्याचा परिणाम देशांतर्गत इंधन दरवाढीवर होऊ दिला नाही.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन