‘वक्फ बोर्डा’च्या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

‘सद्य:स्थितीत भारतीय रेल्वेच्या नंतर सर्वाधिक भूमी ‘वक्फ बोर्डा’च्या नावे आहे. वर्ष १९२३ मध्ये ‘वक्फ बोर्डा’ला सामान्य अधिकार होते; मात्र काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अनुक्रमे वर्ष १९५४, १९९५ आणि २०१३ मध्ये ‘वक्फ बोर्डा’ला अधिकाधिक विशेषाधिकार देण्यात आले. परिणामी ‘वक्फ बोर्ड’ने हवी ती भूमी स्वत:च्या कह्यात घेतली आणि दुसर्‍या बाजूला हिंदू अजूनही निद्रिस्त आहेत. ‘एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे. बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांत ‘वक्फ बोर्डा’ने मोठ्या प्रमाणात हिंदूंची भूमी बळकावली आहे. कायद्याचा उपयोग करून ही भूमी आपण पुन्हा मिळवू शकतो.’