आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मागणी

सातारा – गेल्या दळणवळण बंदीमध्ये फेरीवाल्यांची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या वतीने त्यांना प्रत्येकी १ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देण्याची घोषण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली होती. आता दीड मास उलटूनही त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्या साहाय्याचे काय झाले ? असा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. ‘सध्या दळणवळण बंदी असल्यामुळे हातावर पोट असणार्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचा विचार करून त्यांना तात्काळ आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Sant Balumama Devasthan Scam : तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके यांच्यासह कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद !