
सातारा, ६ (वार्ता.) – कोरोनाच्या पहिल्या लाटेहून दुसर्या लाटेत बाधितांचा आकडा वाढलेला असून कोरोनामुळे मृत्यूदरातही वाढ नोंदली जात आहे. ५ मेच्या रात्री १२ वाजता जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत कोरोनाने ५८ बाधितांचा बळी घेतला आहे.
कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे कैलास स्मशानभूमीवरती अंत्यसंस्काराचा ताण येत असून अंत्यसंस्कारासाठी जागा अल्प पडू लागली आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत २३७६ नागरिकांचे अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आले होते. आतापर्यंत ही संख्या १ लाख १४ सहस्र २४२ वर गेली असून २ सहस्र ७०० नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण