राज्यातील शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात आली आहे. वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाला १४ जूनपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. विदर्भाचे तापमान लक्षात घेता त्या ठिकाणी २८ जूनपासून शाळांना प्रारंभ होईल. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये हे सध्या बंद आहेत.