स्मशानात अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह देऊ नयेत !

मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला सूचना !

मुंबई उच्च न्यायलय

मुंबई – राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. परिणामी एकाच वेळी अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत, याची मुंबई उच्च न्यायलयाने नोंद घेत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होईपर्यंत मृतदेह देऊ नयेत, अशी सूचना सरकारला केली आहे. कोरोनाच्या काळातील समस्यांविषयी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. तिच्यावरील सुनावणीच्या काळात मुंबई उच्च न्यायालयाने वरील सूचना दिल्या आहेत. अंत्यसंस्काराच्या ठिकाणांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत, तसेच राज्यातील शवागृहांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.