जबलपूर (मध्यप्रदेश) येथील रुग्णालयात ऑक्सिजन न्यून झाल्याने ५ रुग्णांचा मृत्यू

डॉक्टर आणि कर्मचारी यांचे रुग्णांना सोडून पलायन !

असे डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे रुग्ण तडफडू लागले, तेव्हा येथील डॉक्टर आणि कर्मचारी पळून गेले. याची माहिती रुग्णांच्या कुटुंबियांनी पोलिसांनी दिल्यावर पोलीस रुग्णालयात आले आणि त्यांनी काही ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करत निदर्शने केली. रुग्णालयाने त्यांच्याकडे ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा (बॅकअप) ठेवला नसल्याचे समोर आले.