
त्रेतायुगी राक्षस रावण वध करण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र प्रकटले ।
द्वापरयुगी धर्मद्रोही कौरव माजता पांडवांसी रक्षण्या श्रीकृष्ण अवतरले ॥ १ ॥
सोळाव्या शतकात यवन मातल्याने जिजाऊंच्या रूपे आई भवानी प्रकटली ।
तिने छत्रपती शिवाजी महाराजांकडून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली ॥ २ ॥
हिंदु धर्म आणि ‘हिंदवी स्वराज्य’ यांची रक्षणकर्ती जिजामाता ठरली ।
तिने शेवटचा श्वास सोडला शिवराज्याभिषेकाचा सोहळा पाहूनी ॥ ३ ॥
घोर कलियुगांतर्गत कलियुगी अवतरले परात्पर गुरुदेव (टीप) महान ।
सूक्ष्मातील अतीगूढ विषय शब्दबद्ध करून निर्मिली ग्रंथसंपदा महान ॥ ४ ॥
पृथ्वीतलावर कुणीही त्यांच्यासारखे कदापीही न दिसती ।
असे हे परात्पर गुरुदेव महान थोर असती कलियुगी ॥ ५ ॥
जैसे श्रीविष्णूचे अवतार श्रीकृष्ण आणि श्रीराम थोर ।
सनातन संस्थेमुळे आम्हा लाभली परात्पर गुरुमाऊली थोर ॥ ६ ॥
कलियुगातील कलियुगी हिंदु राष्ट्र यावे, ही एकच आस ।
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ या ध्यासासाठी प्रत्येक श्वास ॥ ७ ॥
टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले
– सौ. अंजली बाळासाहेब विभूते, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.३.२०१८)
|
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !