‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना एका जहाजातून कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे जाणवून सुरक्षित वाटणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. १९.५.२०२५ या दिवशी महोत्सवस्थळी ‘धन्वन्तरि याग’ करण्यात आला. याग संपत आल्यावर मला वातावरणात पुष्कळ पालट जाणवला. ‘सर्व साधक एका मोठ्या नौकेत बसले असून ती नौका पुढे जात आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आम्हा सर्वांना कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले. (प्रत्यक्षात यज्ञ चालू असतांना मुसळधार पाऊस चालू झाल्यामुळे यज्ञस्थळ सोडून इतरत्र सर्व जलमय झाले होते. – संकलक) त्या वेळी मला शांत आणि सुरक्षित वाटत होते. मी महोत्सवाच्या ठिकाणाहून निघेपर्यंत मला असे अनुभवायला येत होते.’

– एक साधिका (२०.५.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक