‘देऊळ बंद’ असल्याने भाविकांची अनुपस्थिती

अक्कलकोट – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि श्री स्वामी समर्थ यांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात १४ एप्रिल या दिवशी स्वामींचा प्रकटदिन अत्यंत साधेपणाने; परंतु उत्साहात पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ‘देऊळ बंद’ ठेवल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती होती.

कोरोनामुळे प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत ‘देऊळ बंद’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र स्वामींचे नित्योपचार, पूजा, आरती आदी धार्मिक उपचार चालू आहेत. स्वामींच्या प्रकटदिनाच्या दिवशी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती झाली. दुपारी १२ वाजता मंदिरातील गाभार्यात मंदिर समितीचे पदाधिकारी आणि मोजक्या सेवेकर्यांच्या उपस्थितीमध्ये गुलाल-पुष्प वाहून भजन-गीताने पाळणा कार्यक्रम पार पडला. नंतर नैवेद्य, आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी मुख्य पुरोहित मंदार पुजारी, मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी आदि मान्यवर उपस्थित होते.
मंदिरे धर्मजागृतीचा संदेश देणारी केंद्रे व्हावीत ! – राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन
महाबळेश्वर आगारातील धर्मांध वाहतूक निरीक्षकाचे निलंबन !
मलंगगडाची मागणी पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन !
Gokarna Temple : गोकर्ण येथील जगप्रसिद्ध महाबळेश्वराचे ‘आत्मलिंग’ सांडपाण्यात बुडाले !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !