‘देऊळ बंद’ असल्याने भाविकांची अनुपस्थिती

अक्कलकोट – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि श्री स्वामी समर्थ यांचे मूळस्थान असलेल्या अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात १४ एप्रिल या दिवशी स्वामींचा प्रकटदिन अत्यंत साधेपणाने; परंतु उत्साहात पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश पाळत ‘देऊळ बंद’ ठेवल्यामुळे भाविकांची अनुपस्थिती होती.

कोरोनामुळे प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत ‘देऊळ बंद’ ठेवण्याचे आदेश दिले आहेत; मात्र स्वामींचे नित्योपचार, पूजा, आरती आदी धार्मिक उपचार चालू आहेत. स्वामींच्या प्रकटदिनाच्या दिवशी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती झाली. दुपारी १२ वाजता मंदिरातील गाभार्यात मंदिर समितीचे पदाधिकारी आणि मोजक्या सेवेकर्यांच्या उपस्थितीमध्ये गुलाल-पुष्प वाहून भजन-गीताने पाळणा कार्यक्रम पार पडला. नंतर नैवेद्य, आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी मुख्य पुरोहित मंदार पुजारी, मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी आदि मान्यवर उपस्थित होते.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !