‘१३.७.२०२० या दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे पूजा करत होते. तेव्हा मी माझ्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तिळाच्या तेलाचा दिवा तेवत ठेवला होता. त्यामुळे मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते आणि मला सकारात्मक ऊर्जेची जाणीव होत होती. काही वेळाने (अकस्मात्) दोन्ही दिव्यांतून सूर्याच्या किरणांप्रमाणे किरण निघत आहेत आणि ‘ते किरण माझ्या दिशेने येत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला आणि माझे अंतःकरण भरून आले. तेव्हा मला ‘देवाशी बोलावे’, असे वाटले आणि मी देवाला विचारले, ‘देवा, तुझ्या कृपेमुळे मी सनातन संस्थेशी जोडले गेले आहे. मी निवडलेला हा मार्ग योग्य आहे ना ?’ त्या वेळी मी बसलेले आसन (चौरंग) अकस्मात् देवाच्या दिशेने सरकले. या आधी चौरंग हळूहळू सरकत असे; परंतु आज ‘उपस्थित असलेल्या चांगल्या शक्तीने आसन सरकवून मला कौल दिला आहे’, असे वाटले.’
– सौ. प्रियांका सावंत, ठाणे (१४.७.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकर
गुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !
आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘रुग्णाईत व्यक्तीने सतत नामजप केल्यास तिचे तीव्र प्रारब्ध हळूहळू न्यून होते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले