‘१३.७.२०२० या दिवशी संध्याकाळी मी नेहमीप्रमाणे पूजा करत होते. तेव्हा मी माझ्या डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तिळाच्या तेलाचा दिवा तेवत ठेवला होता. त्यामुळे मला पुष्कळ प्रसन्न वाटत होते आणि मला सकारात्मक ऊर्जेची जाणीव होत होती. काही वेळाने (अकस्मात्) दोन्ही दिव्यांतून सूर्याच्या किरणांप्रमाणे किरण निघत आहेत आणि ‘ते किरण माझ्या दिशेने येत आहेत’, असे मला जाणवले. त्या वेळी माझा भाव जागृत झाला आणि माझे अंतःकरण भरून आले. तेव्हा मला ‘देवाशी बोलावे’, असे वाटले आणि मी देवाला विचारले, ‘देवा, तुझ्या कृपेमुळे मी सनातन संस्थेशी जोडले गेले आहे. मी निवडलेला हा मार्ग योग्य आहे ना ?’ त्या वेळी मी बसलेले आसन (चौरंग) अकस्मात् देवाच्या दिशेने सरकले. या आधी चौरंग हळूहळू सरकत असे; परंतु आज ‘उपस्थित असलेल्या चांगल्या शक्तीने आसन सरकवून मला कौल दिला आहे’, असे वाटले.’
– सौ. प्रियांका सावंत, ठाणे (१४.७.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ