धामणी (जिल्हा सातारा) येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे घर जळून खाक

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २३ मार्च (वार्ता.) – पाटण तालुक्यातील धामणी येथील डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे डोंगरावर रहाणार्‍या एकनाथ बाबूराव नायकवाडी यांचे घर जळून खाक झाले आहे. आग लागली, तेव्हा घरात कुणी नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमध्ये १ लाख ८६ सहस्र रुपयांची हानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दुपारी डोंगराला आग लागली. वाळलेल्या गवतामुळे आग वार्‍याच्या जोराने घराच्या दिशेने पसरत गेली. घराला आग लागलेली कळताच ग्रामस्थांनी घराच्या दिशेने धाव घेतली; मात्र तोपर्यंत आग सर्वदूर पसरली होती. घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, तलाठी कोडापे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून घटनेचा पंचनामा केला आहे.