बदायू (उत्तरप्रदेश) येथे साधूंची अमानुषपणे हत्या करून त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला !

उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या विविध कारणांवरून हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची दयनीय स्थिती लक्षात येते ! भाजपच्या राज्यात अशा घटना वारंवार घडणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !

बदायू (उत्तरप्रदेश) – येथील मिहौना गावामध्ये एका साधूंची अमानुषपणेे हत्या करून त्यांचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकल्याची घटना समोर आली आहे. साधूंचा तोंडावळा चिरडण्यात आल्याचे आढळले आहे. साधूंचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याचेही दिसून आले आहे.

 (सौजन्य : prime 18news)

येथील काही लोकांनी सांगितले की, २ दिवसांपूर्वी या साधूंना एका तरुणाच्या घरामध्ये पहाण्यात आले होते. साधूंचा मृतदेह सापडल्यावर हा तरुण बेपत्ता झाला आहे. साधूंचे नाव रामचंद्र असून ते इस्लामनगर येथील सोहरा गावातील निवासी असल्याची माहिती मिळाली आहे.