
१. संतांचे बोलणे ऐकून साधिकेला पुष्कळ आनंद होणे आणि अंजलीताईच्या तोंडवळ्यावरही पुष्कळ आनंद दिसल्याने ‘ती साधिकेला झालेल्या आनंदामुळे आनंदी झाली आहे’, हे लक्षात येणे
मी २ वर्षांपासून रामनाथी आश्रमात कलेशी संबंधित सेवा करत आहे. ‘३१.१२.२०२० या दिवशी मला प्रथमच एका संतांना एक सेवा दाखवायची संधी मिळाली. मी ही सेवा प्रथमच करत असल्याने मला पुष्कळ भीती वाटत होती. त्या वेळी माझ्या समवेत कु. अंजली क्षीरसागर ही साधिका असल्यामुळे मला तिचा पुष्कळ आधार वाटत होता. संत सहजच माझ्याशी इतर विषयांवरही बोलले. तेव्हा मी पुष्कळ हसले. त्या वेळी अंजलीताईच्याही तोंडवळ्यावर आनंद दिसत होता. ती माझ्यासाठी आनंदी झाली होती आणि माझ्या आनंदात तिने तिचा आनंद शोधला होता. तिचा तो आनंदी तोंडवळा मी कधीच विसरणार नाही. त्या क्षणी मला तिच्यातील ‘त्याग’ या गुणाची जाणीव झाली. हा माझ्यासाठी अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय दिवस होता.

२. घरच्यांच्या आजारपणाचा ताण विसरून साधिकेच्या आनंदात निर्मळ मनाने सहभागी होणारी अंजलीताई !
मध्यंतरी घरातील सदस्य आजारी असतांना अंजलीताई रामनाथी आश्रमात राहून सर्व कुटुंबियांना भ्रमणभाषवरून संपर्क करत होती. त्यांची काळजी घेत होती आणि त्यांना लागणार्या सर्व गोष्टींसाठी समन्वयही करत होती. या सर्व गडबडीतच संतांना एक सेवा दाखवायची असतांना ताई घरच्यांचे आजारपण विसरून केवळ माझ्यासाठी आनंदी झाली. मी तिच्या जागी असते, तर माझ्या घरच्यांच्या काळजीने मी अस्थिर आणि हळवी झाले असते. ‘जी व्यक्ती देवासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते, ती निस्वार्थी असते’, हे मला ताईकडून शिकायला मिळाले.
अंजलीताई, तुला वाढदिवसाचा नमस्कार ! ‘ताई लवकर संत व्हावी आणि तिने तिच्या समवेत आम्हा सगळ्यांना साधनेत पुढे घेऊन जावे’, अशी मी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. स्मितल भुजले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२१)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधनेच्या संदर्भात इतरांना जे काही साहाय्य करता येईल, ते मी करतो’, या प्रयत्नांचे आणि संत तुकाराम महाराज यांच्या ‘आता उरलो उपकारापुरता’ या उक्तीशी असलेले साम्य !