छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यासाठी मंगळवेढा येथे नागरिकांची स्वाक्षरी मोहीम !

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – शहरातील मुख्य चौक येथे मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभा करण्यात यावा, या मागणीसाठी शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी स्वाक्षर्‍यांची मोहीम राबवली. ३ दिवस चाललेल्या या मोहिमेत पहिल्या दिवशी २ सहस्रांहून अधिक नागरिकांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. (महाराष्ट्रात अशी मागणी करावी लागणे लज्जास्पद ! – संपादक)

मागील २५ वर्षांपासून शहरातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभा करण्याची मागणी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंगळवेढा किल्ला आणि परिसरामध्ये वर्ष १६६५ मध्ये २५ दिवस वास्तव्य होते. त्यांचा हा पदस्पर्श शहर आणि तालुक्यासाठी प्रेरणादायी व्हावा, या उद्देशाने नागरिकांनी ही मागणी केली आहे.