
पुणे – देशभरातील महामार्गांवरील टोल नाक्यांवर १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून फास्टॅग प्रणालीची कार्यवाही चालू झाली आहे; मात्र ही प्रणाली महामार्गांवरील चारचाकी वाहनांसह शहरातील चारचाकींसाठीही बंधनकारक केली आहे. केवळ शहरातच फिरणार्या चारचाकींना फास्टॅगची सक्ती करण्यास आणि त्याचे पालन न केल्यास दंड वसूल करण्यास नागरी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. शहरात फास्टॅग सक्ती कशासाठी ?, याविषयी सरकार स्पष्टीकरण देत नाही, तोपर्यंत शहरात या तरतुदीची कार्यवाही आणि दंडवसुली करू नये, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली.

देशभरातील एकूण चारचाकी वाहनांपैकी अवघ्या २५-३० टक्के वाहनांनाही फास्टॅग वितरण झाले नसतांना, शहराच्या हद्दीत त्याची सक्ती करणे अवैध आणि अमानवी आहे, असे मत टोल अभ्यासक संजय शिरोडकर यांनी मांडले.
‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
आजगावसह आजूबाजूच्या गावांत खाण प्रकल्प होऊ देणार नाही ! – पालकमंत्री नितेश राणे
‘ॲमेझॉन’च्या ‘ॲमेझॉन नाऊ’ विज्ञापनातून थोर शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा अक्षम्य अवमान !
थोडक्यात महत्त्वाचे : (२०.०६.२०२६)