कशेडी घाटात खासगी बसला अपघात : एका लहान मुलाचा मृत्यू

रत्नागिरी – शिव (मुंबई) येथून कणकवलीकडे जाणारी ‘चिंतामणी’ नावाची खासगी बस पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास खेड जवळील कशेडी घाटात ५० फूट दरीमध्ये कोसळली. या बसमधून २७ प्रवासी प्रवास करत होते. यातील बहुतांश प्रवासी संगमेश्‍वर येथील आहेत.

या अपघातातील २५ प्रवाशांना गाडीबाहेर काढण्यात यश आले असून एका लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचे नक्की कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची विनामूल्य रुग्णवाहिका, तसेच महाराष्ट्र शासनाच्या १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी कार्यरत आहेत. प्रवाशांना कळंबणी आणि पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयांत घायाळ प्रवाशांना भरती करण्यात आले आहे.