किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांचा २२ डिसेंबर या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी शारीरिक त्रासांसाठी सांगितलेले उपाय येथे देत आहोत.

प.पू. देवबाबा यांना सनातन परिवाराकडून वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पोटदुखी थांबण्यासाठी तोंडातील लाळ हे सर्वोत्तम औषध !
‘आपल्या तोंडातील लाळ हे पोटदुखीवरील सर्वोत्तम औषध आहे. पोट दुखत असल्यास आवळ्याचा तुकडा तोंडात धरावा. तो चावून खाऊ नये. तोंडात आवळा ठेवल्यावर सुटलेली लाळ गिळावी. त्यामुळे पोटदुखी थांबते. जर आवळा मिळाला नाही, तर एखाद्या फळाचा तुकडाही तोंडात धरू शकतो.
२. सांधेदुखीसाठी कपिला गायीचे शेण लावणे
शरिराच्या दुखणार्या भागावर कपिला गायीचे शेण लावावे. लेप लावतो, त्याप्रमाणे शेणाचा जाड थर लावावा. नंतर ते शेण पडू नये; म्हणून त्यावर कापड बांधावे आणि ते ६ घंटे ठेवावे. हे दिवसाही लावू शकतो. असे ७ दिवस नियमित करावे. नंतर १ आठवडा लावू नये. त्यानंतर पुन्हा ७ दिवस लावावे. हा उपाय आपण गुडघेदुखी, डोकेदुखी इत्यादींवरही करू शकतो.
कपिला गायीचे शेण मिळाले नाही, तर इतर देशी (विदेशी नाही) गायींचे शेणही लावू शकतो. त्या शेणाचाही कपिला गायीच्या शेणाएवढा नाही; पण लाभ होतो.’
– प.पू. देवबाबा, किन्नीगोळी, कर्नाटक. (जुलै २०१९)
गुडघेदुखीसाठी उपाय केल्यावर आलेली अनुभूती
‘प.पू. देवबाबांनी सांगितल्याप्रमाणे मी सलग १२ दिवस माझ्या दुखत असलेल्या गुडघ्याला शेण लावले. त्यामुळे माझ्या गुडघ्याला आलेली सूज काही प्रमाणात न्यून झाली.’ – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
Kerala Shigella Outbreak Reported : केरळम्मध्ये ‘शिगेला’ संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू, १२६ जणांना लागण !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !