विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगता येऊन ईश्वरप्राप्तीसाठी अपेक्षित प्रयत्न करणे सुलभ होते !

‘एकदा माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली. त्या वेळी त्यांनी माझी कन्या सौ. वैदेही गौडा हिच्याविषयी विचारपूस केली. तेव्हा मी सांगितले, ‘‘विवाहानंतर पहिल्या वर्षी तिला श्री. गुरुप्रसाद गौडा (जावई) यांच्याकडून अपेक्षा असायच्या. ‘त्याने तिला भ्रमणभाष करावा, बोलावे, वेळ काढावा, वेळ द्यावा’, अशा तिच्या अपेक्षा असत. त्यामुळे साधना आणि सेवा वरवरचे असायचे; पण आता ती ‘तिचा विवाह झाला आहे’, हे विसरली आहे’, असे वाटते; कारण आता तिच्याशी बोलतांना विवाहापूर्वी जशी ती सेवा आणि साधना करायची, तसे करत असल्याचे लक्षात येते.
आता या वर्षभरात असे प्रसंग घडले नाहीत; कारण आता ती पू. रमानंदअण्णा यांच्या समवेत सेवा करू लागली आहे. त्यांच्याशी ती मनमोकळेपणाने बोलते आणि साधनेविषयी त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेते. ‘आता तिच्या गुरुप्रसादविषयीच्या अपेक्षा संपल्या आहेत’, असे वाटते. त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘छान ! असेच अपेक्षित असते. विवाह झालेल्या किंवा करू इच्छिणार्या सर्वांनाच या प्रसंगातून शिकायला मिळेल.’’
शिकायला मिळालेले सूत्र
साधना करू इच्छिणारे, पूर्णवेळ साधना करणारे वा व्यावहारिक जीवन जगणार असोत, विवाहानंतर स्वभावदोष आणि प्रारब्ध यांमध्ये अडकण्यापेक्षा साधना, गुरुसेवा अन् ईश्वरप्राप्ती हा केंद्रबिंदू ठेवल्यास आनंदी जीवन जगणे शक्य होऊन ईश्वरप्राप्तीसाठी अपेक्षित प्रयत्न करणे सुलभ होते.’
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.
यांसाठी मंदिरांचे सरकारीकरण नको !
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !