आंबा बागायतदार आणि पोलीस यांच्या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय
उशिरा सुचलेले शहाणपण !

रत्नागिरी – कोरोनाचा संसर्ग असलेल्या अतीसंवेदनशील क्षेत्रामध्ये (रेड झोनमध्ये) आंबा विक्री करून येणारे वाहनचालक आणि त्यांचे सहकारी यांना गोदामात किंवा अन्य वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. आंब्याचा हंगाम संपल्यानंतर चालक आणि सहकारी यांची तपासणी करून त्यांना घरी पाठवण्यात येईल. या वेळी त्यांची निवासाची व्यवस्था बागायतदार करणार आहेत, असा महत्त्वाचा निर्णय येथील शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल लाड आणि आंबा बागायतदार यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मुंबई आणि पुणे येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे या शहरांतील अनेक ठिकाणी रेड झोन घोषित करण्यात आला आहे. कोरोनामुळे आंबा बागायतदारांची आर्थिक हानी होऊ नये, यासाठी शेतमाल वाहतूक आणि आंबा विक्री चालू करण्यात आली आहे. आंबा वाहतूक करणारे या अतीसंवेदनशील क्षेत्रात आंबा पोचवत आहेत; मात्र ही वाहने परत येतांना त्यांमधून मुंबईकर कोकणात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचेही लक्षात येत आहे. त्यामुळे आंबा वाहतूकदारांच्या गाड्या परजिल्ह्यांतून रत्नागिरीत आल्यावर चालक आणि त्यांचे सहकारी यांनी सरसकट लोकांमध्ये मिसळू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
लोकलमध्ये हिंदूला चाकूने भोसकले; मुसलमानासह तिघे कह्यात !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi