असे करणार्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !
मंगळवेढा (जिल्हा सोलापूर) – पाठखळ येथील प्रहार उद्योग समूह, तसेच कृषी केंद्राचे दुकान आणि गोदाम यांवर कृषी विभागाने घातलेल्या धाडीत खताच्या नावाखाली मिठाची विक्री होत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी १० लाख ४६ सहस्र ७८० रुपयांच्या भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला असून सतीश मनोहर भोसले (रा. पाठखळ) आणि रविराज शंकर कणसे (रा. सातारा) यांच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेतकर्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने ही कारवाई केली.
अन्वेषणात संबंधितांनी भेसळयुक्त खतांचा साठा करून त्याची विक्री केल्याचे आढळून आले, तसेच खत विक्रीसंदर्भातील आवश्यक देयके आणि कागदपत्रेही सादर करता आली नाहीत. हरिदास बोंगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करत आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !
अहिल्यानगर येथे धार्मिक सहलीचे आमीष दाखवून आर्थिक फसवणूक !