
१. ध्यानमंदिरात बसल्यावर साधकाला ‘देवांच्या सभेत बसून नामजप करत आहे’, असे दृश्य दिसून सिंहासनारूढ श्रीविष्णूचे दर्शन होणे

‘गुढीपाडव्याच्या दिवशी (१९.३.२०२६) मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात उपायांसाठी बसलो होतो. त्या वेळी डोळे मिटल्यावर मला सूक्ष्मातून पुढीलप्रमाणे जाणवले, ‘मी देवांच्या सभागृहात (दरबारात) आहे. मी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत आहे; परंतु माझ्या शेजारी बसलेल्या साधकाने मला ‘श्री विष्णवे नमः ।’ हा नामजप करायला सांगितला. त्या वेळी माझे लक्ष समोर गेले. तेथे मला ‘सिंहासनावर साक्षात् श्रीविष्णु विराजमान झालेले दिसले. तेथे नववर्षानिमित्त सभा भरली होती. तेथे सर्व देवता जमल्या होत्या आणि प्रत्येक जण श्रीविष्णूच्या चरणांजवळ जाऊन काही ना काही अर्पण करत होते.
२. कुबेराने श्रीविष्णुचरणी अर्पण केलेल्या पादुका श्रीविष्णूने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाठवण्यास सांगणे
मी तेथे गेलो. त्या वेळी देवांचा खजिनदार असलेल्या श्री कुबेराने सुवर्णमय पादुका श्रीविष्णूच्या चरणी अर्पण केल्या. श्रीविष्णूने त्या पादुकांना स्पर्श करून त्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाठवण्यास सांगितल्या.
३. ‘पृथ्वीवर लवकरच ईश्वरी राज्याची स्थापना होणार असल्याने तेथे धन आणि औषधे यांची आवश्यकता भासणार आहे’, असे श्रीविष्णूने सांगणे
तेव्हा श्रीविष्णूने श्री धन्वन्तरि देवतेला सांगितले, ‘तेथे सर्व औषधी वनस्पतींची लागवड करा. वैद्यांना धन आणि औषधे यांची आवश्यकता भासणार आहे.’ ‘तेथे लवकरच ईश्वरी राज्याची स्थापना होणार असून त्यासाठी या सगळ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे सर्व तेथे पाठवून द्यावे’, असे श्रीविष्णुदेवाने सर्व देवतांना सांगितले.’
– श्री. नंदकिशोर दत्तात्रेय नारकर (वय ७१ वर्षे) सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.३.२०२६)
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी त्यांच्या भक्तांना नागदेवतेचे दर्शन घडवल्याच्या संदर्भातील अनुभूती !
दैवी बालिकांच्या उपस्थितीत झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगातील क्षणमोती !
२३ वर्षांपूर्वी परात्पर गुरुदेवांनी ‘गाडगीळबाईंना (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) भेटून या, तुम्हाला आनंद मिळेल’, असे साधकांना सांगणे आणि साधकांनी ते अनुभवणे
सेवा करतांना मनात भाव असेल, तरच ती सेवा खर्या अर्थाने परिपूर्ण होते ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने साधिकेला झालेले लाभ !