कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला !

सातारा, ९ जुलै (वार्ता.) – शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. गत आठवड्यात चालू झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे ७ जुलै या दिवशी तलाव भरला. यामुळे सातारावासियांची वर्षभरासाठीची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.

विकास परिसरामध्ये अजूनही मुसळधार पाऊस चालूच आहे. कास तलावाची पाणी पातळी ६१.०४८ फुटांपर्यंत पोचल्यावर अतिरिक्त पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे. धरण भरल्यामुळे परिसरातील ओढे, नाले आणि झरे प्रवाहित झाले आहेत. कन्हेर आणि उरमोडी धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भांबोली आणि एक्यू परिसरातील धबधबे जोरात वाहू लागले आहेत.