साधकाला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. गुरुदेवांच्या कृपेने वाईट शक्तीपासून रक्षण होणे

‘एकदा मी रात्री घरी झोपलो असतांना रात्री १२ वाजता माझ्या झोपण्याच्या जागेजवळ असलेल्या एक लाकडी पटलावर जोराने आघात केल्यासारखा आवाज झाला. तेव्हा मी लगेच जागा झालो. मला जवळच एका मोठ्या वाईट शक्तीचा चेहरा दिसला. मी त्या शक्तीला मारायला गेलो; पण ती शक्ती माझ्या हाती लागली नाही.

श्री. सुंदर एम्.के., उजिरे

ती शक्ती माझ्याजवळ असलेल्या प.पू. भक्तराज महाराज, त्यांचे शिष्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांकडे आणि श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहात मागे सरकली अन् दिसेनाशी झाली. ‘गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने माझे रक्षण झाले’, असे मला वाटले आणि माझी भावजागृती झाली.

२. सेवेनिमित्त दुचाकी गाडी वापरल्यावर सेवा संपवून घरी जात असतांना ‘दुचाकी गाडी पाण्यावरून तरंगत चालली आहे’, असे जाणवणे

मला ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा मिळाली आहे. मी दुचाकी गाडीवरून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेऊन जातो. मी सेवा संपवून घरी परत जात असतांना माझी दुचाकी गाडी सात्त्विक झाल्यासारखी वाटते. माझ्या दुचाकी गाडीचा वेग वाढल्यासारखा वाटतो. ‘दुचाकी गाडी पाण्यावरून तरंगत चालली आहे’, असा मला अनुभव येतो. एरव्ही दुचाकी गाडीचा वेग अल्प असल्याचा, तसेच दुचाकी गाडी चालवतांना त्रास होत असल्याचा मला अनुभव येतो. अशी अनुभूती मला प्रत्येक सेवेच्या वेळी येते.’

– श्री. सुंदर एम्.के., उजिरे, दक्षिण कन्नड, कर्नाटक. (३.७.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक