
‘११ व्या शतकात सम्राट भोज यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्यप्रदेशातील धार येथे ‘भोजशाळा’ हे ‘वाग्देवीचे, म्हणजे विद्येचे ज्ञानकेंद्र’ उभारले; परंतु अनेक दशकांपासून भोजराजाद्वारे स्थापित श्री सरस्वतीदेवीच्या या मंदिरावर मुसलमानांनी अतिक्रमण केले होते.

त्यांनी या जागेला ‘कमाल मौला मशीद’ असे नाव दिले आणि तेथे प्रतिदिन नमाजपठण चालू केले. जागृत आणि धर्मप्रेमी हिंदूंच्या ९०० वर्षांच्या अथक संघर्षानंतर १५.५.२०२६ या दिवशी या संघर्षाला देवी सरस्वतीच्या कृपेने यश मिळाले. धार येथील भोजशाळा हे हिंदूंचे वाग्देवी मंदिर आणि संस्कृत अध्ययनाचे केंद्र असल्याने यापुढे तेथे नमाजपठण होणार नसल्याचा आदेश मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठाने दिला. याविषयीचे वृत्त १६.५.२०२६ ला प्रसिद्ध झाले आणि १७.५.२०२६ या दिवशी मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ पार पडला.
श्री राजमातंगीदेवी ही श्री सरस्वतीदेवीच्या तांत्रिक उपासनेचे रूप आहे. यावरून ‘भोजशाळा नमाजमुक्त होणे आणि श्री राजमातंगीदेवीचा यज्ञ होणे’, हे केवळ संयोग नसून दैवी संकेत आहेत. आता ‘श्री राजमातंगीदेवीचे तत्त्व पूर्ण रूपात कार्यरत झाले आहे’, असे जाणवत असून त्यामुळे ‘भारत आता विश्वगुरु पदावर पुन्हा जलद गतीने आरूढ होण्यास साहाय्य होईल’, असे मला वाटले.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.५.२०२६)
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने श्री राजमातंगी महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना आणि प्रत्यक्ष यज्ञस्थळी साधिकेला आलेल्या अनुभूती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने वाचकांना झालेले लाभ
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे !