‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८४ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रभादेवी (मुंबई) येथे १७.५.२०२६ या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘श्री राजमातंगी महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले होते. या महायज्ञाच्या पूर्वसिद्धतेच्या सेवांसाठी दादर येथील एका विद्यालयाच्या परिसरात सेवाकेंद्र उभारण्यात आले होते. मी ४ दिवस या सेवाकेंद्रात सेवेसाठी गेले होते. तेथे यज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना, तसेच यज्ञाच्या दिवशी मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. महायज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना

१ अ. शारीरिक कष्टांची जाणीव न होता आनंद आणि चैतन्य जाणवणे : या ४ दिवसांत मला दिवसभर सेवा असायची. मला काही शारीरिक आजार आहेत; परंतु या वेळी सेवा करतांना मला कोणतेही शारीरिक त्रास जाणवले नाहीत. सेवा करतांना मला आध्यात्मिक लाभ होत होते. दिवसभर सर्वत्र आनंद आणि चैतन्य जाणवत होते.
१ आ. स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णामातेची मूर्ती हसतांना दिसून भावजागृती होणे : सेवाकेंद्रातील स्वयंपाकघरात सेवा करतांना ‘श्री अन्नपूर्णामातेची मूर्ती आपल्याकडे बघून हसत आहे’, असे २ साधकांना दिसले. मी मूर्तीकडे पाहिले, तेव्हा मलाही तसेच जाणवले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि माझ्या डोळ्यांतून भावाश्रू आले.
२. यज्ञाच्या दिवशी
अ. यज्ञाच्या दिवशी सकाळपासून माझ्या मनाला यज्ञाचा ध्यास लागला होता. यज्ञस्थळी पोचल्यानंतर ‘शब्दांत सांगता येणार नाही’, असा आनंद मला होत होता.
आ. यज्ञाच्या वेळी पुरोहित मंत्रपठण करत असतांना माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू येत होते. माझे मन श्री राजमातंगीदेवीच्या चरणी सतत अर्पण होत होते. यज्ञ केव्हा पूर्ण झाला, हे मला कळलेही नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला या चैतन्याचा लाभ झाला. त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
– सौ. सविता शिंदे, बेलापूर, नवी मुंबई. (२२.५.२०२६)
हिंदु धर्माच्या शिकवणीला चुकीचे म्हणणारे बुद्धीप्रामाण्यवादी !
धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळा (श्री सरस्वतीदेवीचे मंदिर) नमाजमुक्त होणे आणि लगेचच प्रभादेवी, मुंबई येथे श्री राजमातंगीदेवीचा महायज्ञ होणे, हे दैवी संकेत !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधक अनुभवत असलेली भावस्थिती !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
धर्मांधांनी केलेली राष्ट्रहानी आणि त्याकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष !