
बागपत (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरात चोरी होणे, ही काही नवीन गोष्ट नाही. तुम्ही हे सूत्र आता मांडले आहे; पण तेथे फार आधीपासून चोरी होत आहे. मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात. मंदिर निर्मितीच्या वेळी तज्ञांना बोलावणे आवश्यक होते. मंदिर उभारणीच्या कामासंदर्भात ४ शंकराचार्य आणि १३ आखाड्यांचे प्रमुख सिद्ध होते; मात्र त्यांना बाजूला सारून स्वतःच्या विशेष लोकांना न्यासामध्ये घेण्यात आले. जेव्हा तुम्ही तुमच्या विशेष लोकांना ठेवता, याचा अर्थ ते स्वतःचे काम करू शकतील; म्हणूनच त्यांना ठेवले गेले. तिथे चोरी होणार, हे त्याच वेळी स्पष्ट झाले होते, अशी प्रतिक्रिया ज्योतिष पीठाचे शंकराचार्थ स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे व्यक्त केली.
आगामी निवडणुकीत गोमातेच्या रक्षणासाठीच मतदान करा !
गोमातेच्या रक्षणाविषयी शंकराचार्य म्हणाले, ‘‘गोमाता हा केवळ श्रद्धेचा विषय नाही, तर भारतीय संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा पाया आहे. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवावा, यासाठी आम्ही संपूर्ण उत्तरप्रदेश राज्यात जनजागरण यात्रा काढत आहोत. आतापर्यंत अनुमाने २०० विधानसभा मतदारसंघांतील लोकांशी संवाद साधला आहे. आगामी निवडणुकीत गोमातेच्या रक्षणासाठीच मतदान करा.’’
गोमांस भक्षणाचा प्रचार करणारी संस्था आणि उत्तरदायी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा !
Lipstick Free Campus : केरळमध्ये ‘लिपस्टिक’मुक्त शाळा परिसर’ अभियानाला प्रारंभ !
Trump Vs Lula : ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करू नका !
अमेरिकेने सर्वांत मोठ्या सैनिकी कमांडमधून ‘इंडो’ शब्द काढला !
आज सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचे मतदान !
गोव्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद सावकार यांचे निधन