
‘जागतिक बँके’च्या अहवालानुसार भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या एकूण उत्पादनाचे मूल्य (मॅन्युफॅक्चरिंग आऊटपुट) आता ७८० बिलियनच्या डॉलर्सच्या (७४ लाख २४ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) पार गेले असून जगातील पहिल्या ५ उत्पादक देशांमध्ये भारताचा समावेश प्रथमच झाला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात हे मूल्य जेमतेम ३०० बिलियन डॉलर्स (२८ लाख ५५ सहस्र कोटी रुपयांहून अधिक) इतकेच होते.

भारतीय अर्थव्यवस्थेचा बोलबाला सेवा क्षेत्रापुरता मर्यादित नसून मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ (भारतात उत्पादन करणे) प्रकल्पाच्या अंतर्गत भारत आता उत्पादन क्षेत्रातही एक आघाडीची शक्ती ठरला आहे, हे नक्की !
‘मोदींनी अर्थव्यवस्थेची वाट लावली’, असा नॅरेटिव्ह (खोटे कथानक) निर्माण करण्याचा प्रयत्न कितीही जोरात होत असला, तरी वास्तव पूर्णपणे वेगळे आहे, हे लोकांना नीट कळले आहे. याविरुद्ध कुणी असत्य प्रचार केला, तरी तो आता सहज मान्य होणार नाही.
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (१५.६.२०२६)
आम्ही (भारत) अमेरिका आणि युरोप यांना ऐकत नाही, मग तुम्ही कोण ?
कॉकरोच वक्तव्य ते भारतविरोधी कथानकांचे जाळे : मानसिक युद्ध पालटत्या जगाचे !
‘धर्मादाय’ रुग्णालये कागदावर, प्रत्यक्षात मात्र गरिबांची लूट !
भारत हिंदूबहुल असल्याने धर्मनिरपेक्ष, एखादा इस्लामी देश धर्मनिरपेक्ष असल्यास सांगा ! – राजा भैया, आमदार, उत्तरप्रदेश
Muslims Oppose : (म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण नाही, तर योग दिन का ?’