पालटलेली पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार !

मुंबई – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी यांसह सहावीची पुस्तके पालटण्यात आली. ही पुस्तके बालभारतीने सिद्ध केली असून बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षात प्रथमच एका वर्षात ४ इयत्तांची पुस्तके पालटण्यात आली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ही पुस्तके मिळतील.
📚 A welcome step in correcting historical neglect!
CBSE textbooks will now feature a 20-page chapter on Chhatrapati Shivaji Maharaj, expanded from just 1.5 pages earlier, informed Education Minister Dada Bhuse.
The revised books will be available from the first day of school.… pic.twitter.com/nbM40sezjF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 11, 2026
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता आठवीच्या पुस्तकामध्ये यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य यांच्याविषयी केवळ दीड पानाचेच लिखाण होते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण विभागाकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवरायांविषयी २० पानांचा धडा समाविष्ट केला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी, प्रयोगशील आणि अनुभवसमृद्ध करण्यावर या पुस्तकांमध्ये भर दिला आहे. भारतीय ज्ञान परंपरा, स्थानिक संदर्भ, विविध उपक्रम, संकल्पनाचित्रे आणि सारणी यांच्या माध्यमातून शिक्षण अधिक अनुभवाधारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करा !
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !