
१. धर्माच्या वाटेवर मार्गक्रमण करतांना जरी अपयश आले, तरी ते फार मोठे यश ठरणे !
‘तोच जिवंत आहे, ज्याच्या जीवनात धर्म आहे. बाकीचे सगळे मृतवत् आहेत. धर्माविना सगळे निष्फळ आहे. धर्माच्या वाटेवर जरी अपयश आले, तरी ते फार मोठे यश ठरते. अधर्माच्या वाटेवर जरी मोठे यश आले, तरी ते धर्माच्या वाटेवर फार मोठे अपयश सिद्ध होते.
२. विषाचेही अमृत बनवण्याची विलक्षण शक्ती धर्मात असणे !
धर्मात विलक्षण शक्ती आहे. विषाचेही तो अमृत बनवतो. अधर्म अमृताचेही विष बनवतो. अधर्माने वागणारा राहू (राहू-केतुपैकी राहू) अमृत पिऊनही मेला !
३. विश्वकल्याणाकरता प्रखर हलाहल पिऊनही अमर होणारे शिवशंकर हे धर्म काटेकोर आचरणारे महान आदर्श ठरले !
धर्म काटेकोर आचरणारे विश्वकल्याणाकरता कणा-कणाने झिजणारे शिवशंकर प्रखर हलाहल विष पिऊनही अमर झाले. निलकंठ झाले. प्रत्येक मनुष्याने नीलकंठ महादेव बनण्याचे सामर्थ्य संपादन करावे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(संदर्भ : मासिक ‘घनगर्जित’, जून २०१४)
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?