केरळम्चे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांचा आरोप

थिरूवनंतपूरम् (केरळम्) – संपूर्ण ‘वन्दे मातरम्’गाण्याची आवश्यकता नाही, हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. ‘वन्दे मातरम्’ची केवळ पहिली २ कडवी गायली जात असतांना उभे रहाण्याचीही आवश्यकता नाही. ‘वन्दे मातरम्’चे पूर्ण गायन करणे हा रा.स्व. संघाच्या धोरणाचा भाग आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी संपूर्ण गाणे गायले गेले, जे व्हायला नको होते.
🚨 Former Kerala CM Pinarayi Vijayan objects to singing the full Vande Mataram, calling it an RSS policy.
The truth is that refusing to sing the full Vande Mataram was part of decades-long Muslim appeasement politics practiced by the Congress ecosystem.
With the BJP-led Central… pic.twitter.com/XFNualmuo4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 31, 2026
त्यानंतर राज्य सरकारने कठोर निर्णय घेतल्याचे दिसते. हीच भूमिका घेतली पाहिजे, असे विधान केरळम्चे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन् यांनी केले. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या अभिभाषणाच्या वेळी केरळम् विधानसभेत संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ न गायल्याने राष्ट्रीय गाण्याचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला होता. यानंतर विजयन् यांनी या प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल उपस्थित असलेल्या कार्यक्रमांमध्ये ‘वन्दे मातरम्’ पूर्ण सादर करण्याचे केंद्रशासनाचे निर्देश आहेत; परंतु केरळम् विधानसभेने त्याचे पालन केले नाही. हा राज्यपालांचा अपमान आहे. ‘१५० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘वन्दे मातरम्’चा अनादर करण्यात आला’, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार व्ही. मुरलीधरन् यांनी केला.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक