
छत्रपती संभाजीनगर – नुकताच उल्कानगरी मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. सनातनचे चांगले कार्य केल्याविषयी सनातनच्या साधिका सौ. ऋचा अशोक वर्मा यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून भारतमाता, भगवान बसवेश्वर आणि भगवान परशुराम यांच्या पूजनाने करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे श्री. बंगाळे यांनी हिंदु धर्माविषयी मार्गदर्शन करत मुलांवर योग्य संस्कार करण्याचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाला उल्कानगरी प्रभागातील चारही नगरसेवक उपस्थित होते. या प्रसंगी सौ. ऋचा अशोक वर्मा यांनी सनातन संस्थेच्या कार्याची माहिती देत संस्था सामाजिक कार्य, राष्ट्र आणि धर्मप्रसारासाठी कशा प्रकारे कार्यरत आहे, हे सांगितले. या सत्काराचे श्रेय त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना अर्पण केले. गुरुकृपेमुळेच साधकांना ही सेवा करता येत असल्याची कृतज्ञताही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे !
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी