
साधुत्वाच्या नावाखाली आपल्या समाजामध्ये जो दंभाचार वाढला आहे. टिळे- माळा, मोठी शिष्यशाखा, भजन-पूजनाचे उत्सव महोत्सव, भंडारे, मोठा वैभवशाली मठ किंवा वक्तृत्वसंपन्न धार्मिक प्रवचने ऐकण्यासाठी सहस्रोंनी लोक गोळा होतात, असे पाहून त्या त्या व्यक्तीला आपण साधू वा सत्पुरुष समजतो. सत्पुरुषाजवळ वरील काही असेलही किंवा नसेलही; पण ते साधुत्वाचे लक्षण ठरू शकत नाही. निःस्वार्थीपणा, निःस्पृहता, ईश्वरनिष्ठा, शुद्ध चारित्र्य, आत्मज्ञान असणे आणि लोकेषणा (प्रसिद्धीची हाव), दारेषणा (संसाराची इच्छा), धनेषणा (संपत्तीची लालसा) यांचा अभाव ही लक्षणे ज्याच्याजवळ आहेत, त्यालाच ‘सत्पुरुष’ म्हणावे. हीच लक्षणे सर्वभूतहितत्वाची अंगोपांगे आहेत.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘यक्ष प्रश्न’ या ग्रंथातून)
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !
‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !
म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !