
सांखळी, ३ जून (वार्ता.) – गोव्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याला नवी दिशा देणारा सांखळी येथील पुरातन किल्ला आता सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यटन या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित केला जाणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ३ जून या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला नगराध्यक्ष सिद्धी प्रभु, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, पुरातत्व खात्याचे संचालक डॉ. नीलेश फळदेसाई, जिल्हा सदस्य सुंदर नाईक, सरपंच गौरवी नाईक, महेश सावंत, आनंद काणेकर, मिलिंद रामाणी, प्रियांका डायस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गोव्याची ओळख केवळ समुद्रकिनारे आणि चर्च एवढीच नसून किल्ले, मंदिरे, पुरातन वास्तू हेच राज्याचे खरे वैभव आहे. या वारशाचे जतन करणे, हे आपले सामूहिक उत्तरदायित्व आहे.’’ या किल्ल्याचे ‘खेम सावंत भोसले किल्ला’ असे नामकरण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पुरातत्व खात्याने ३ कोटी २५ लाख रुपये खर्च करून किल्ल्याचे संवर्धन आणि नूतनीकरण केले असून या कामाला वर्ष २०१९ पासून प्रारंभ करण्यात आला होता. किल्ल्याचे नूतनीकरण करतांना मूळ ऐतिहासिक रचना अबाधित ठेवून आधुनिक सुविधांचा समन्वय साधण्यात आला आहे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !