बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांचे पोलिसांना रझाकारी आदेश
प्रमाणापेक्षा अधिक जनावरांची वाहतूक करणार्यांवर कारवाई करणे अवैध !

मुंबई – जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच प्रमाणापेक्षा अधिक जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी जनावरांच्या व्यापार्यांवर कारवाई करणे अवैध आहे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी २८ मे या दिवशी असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती समाजवादी पक्षाचे भिवंडी (पूर्व) चे आमदार रईस शेख यांनी दिली. मुंबईतील अल्पसंख्यांक समाजाचे सर्वपक्षीय आमदार, तसेच राज्य खाटिक महासंघाचे प्रतिनिधी यांची मंत्रालयात प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या समवेत बैठक झाली. यानंतर शेख बोलत होते.
बकरी ईदच्या निमित्ताने देवनार पशूवधगृहात कत्तलीसाठी असलेले २०० रुपयांचे शुल्क २० रुपये करण्यात आले. मुंबईमध्ये कत्तलीसाठी असलेली ७० ठिकाणे वाढवून ती १०९ करण्यात आली. काही गृहनिर्माण संस्थांना कत्तलीसाठी आधीच परवाने दिलेले आहेत. दुकानदारांनाही तशी अनुमती देण्यात आली आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !