‘एकदा मी प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आत्मनिवेदन केले. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी मला अंतर्मुख होता येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मार्गदर्शन केले. ते मी गुरुचरणी अर्पण करत आहे.

मी : परम पूज्य, मला सर्व सुख-सुविधा असूनही मी नामस्मरण करण्यास अल्प पडतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : श्रीकृष्णाचा भक्त सुदामा याच्याकडे तर काहीच नव्हते, तरीही त्याने श्रीकृष्णाचे नामस्मरण करणे सोडले नाही; मात्र आपल्याकडे सर्वकाही असूनही आपण नामस्मरण आणि साधना मनापासून करत नाही.

मी : त्याची मनाला जाणीव आहे; पण प्रयत्न होत नाहीत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मनाला जाणीव होणे, हा एक टप्पा आहे आणि जाणीव होऊन कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे, म्हणजेच खरी साधना करायला आरंभ झाला आहे.
मी : ‘रामनाथी आश्रम, म्हणजे वैकुंठ आहे’, असा भाव ठेवतो; पण त्यानुसार माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘रामनाथी आश्रम, म्हणजे ‘वैकुंठ’ असा तुमचा जरी भाव असला, तरीही ‘वैकुंठात आनंदी रहाता येण्यासाठी कुठे अल्प पडता ?’, याचे चिंतन करा.
मी : जीवनात काहीही नसले, तरीही चालेल; पण ‘गुरु असणे’ पुष्कळ महत्त्वाचे वाटते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : गुरु जीवनात आले आहेत; पण गुरुप्राप्तीसाठी प्रयत्न होत नाहीत. यापेक्षा दुसरे दुःख नाही.
हे गुरुमाऊली, मनाला अंतर्मुख करण्यासाठी आपण मला जे मार्गदर्शन केले, त्यानुसार माझ्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२६)
देश दुर्दशेला पोचण्यामागे हे आहे कारण !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !