१. स्वयंसूचनांचे सत्र करतांना मन एकाग्र होऊन आनंद जाणवणे आणि श्रीकृष्णाने त्याचे कारण सांगणे

‘२४.४.२०२३ या दिवशी मी स्वयंसूचनांचे सत्र आणि प्रार्थना करत असतांना श्रीकृष्णाच्या कृपेने माझे मन एकाग्र झाले. त्या स्थितीत मला एक आनंददायी ओढ जाणवत होती. मी सूक्ष्मातून श्रीकृष्णाला विचारले, ‘हे श्रीकृष्णा, आज मला असे का होत आहे ? एरव्ही मी स्वयंसूचना देतांना मला अशी स्थिती कधीच अनुभवायला आली नाही.’ तेव्हा श्रीकृष्ण मला म्हणाला, ‘जेव्हा तुझ्या मनाला आनंद जाणवतो, तेव्हा मन आपोआपच आनंद देणार्या त्या कृतीवर एकाग्र होते. हा आनंद मानसिक स्तरावर असणार्या सुखासारखा नसतो. मानसिक स्तरावरच्या सुखात मन अडकून रहाते. त्यामुळे व्यक्तीतील स्वभावदोष उफाळून येतात. आध्यात्मिक स्तरावरील आनंद शुद्ध स्वरूपात असल्यामुळे तो व्यक्तीला त्यात गुंतू किंवा अडकू देत नाही.’
१ अ. आत्म्याला लागलेल्या आनंदाच्या ओढीमुळे तो साधनेकडे खेचला जाणे आणि साधनेच्या ज्या अंगावर त्याचे मन एकाग्र होते, ते अंग परमेश्वराशी जोडणारा दुवा बनणे : श्रीकृष्णाच्या कृपेने ही स्थिती अनुभवतांना माझ्या लक्षात आले, ‘माझे मन मी देत असलेल्या स्वयंसूचनांमध्ये एकाग्र झाले होते. स्वयंसूचना ही एका सूक्ष्म आणि वेगळ्याच स्तरावर कार्य करते. त्या माध्यमातून मला ईश्वर आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवले.’
श्रीकृष्णाने हेही माझ्या लक्षात आणून दिले, ‘ऋषिमुनी आणि इतर उन्नत जीव दीर्घकाळापर्यंत साधनेत मग्न रहातात. त्यांचे साधनेतील सातत्य टिकून रहातो; कारण त्यांचा आत्मा त्या दिव्य आनंदाची अनुभूती घेत असतो. त्यामुळे तो त्या आनंदाकडे आपोआप आकर्षिला जातो. तसेच तो आनंद पुनःपुन्हा अनुभवण्याची तीव्र इच्छा त्यांच्या अंतःकरणात निर्माण होते.’
‘जेव्हा आत्म्याला आनंदाची ओढ लागते आणि त्या आनंदामुळे तो साधनेकडे खेचला जातो, तेव्हा त्याचे मन साधनेवर आपोआपच एकाग्र होते. तसेच साधनेचे ते अंग (स्वयंसूचना) हा परमेश्वराशी जोडणारा दुवा बनतो’, हे मला उमगले.’
२. श्रीकृष्णाने स्वयंसूचना पालटण्याचे महत्त्व सांगणे
२९.५.२०२३ या दिवशी मी स्वयंसूचना देत असतांना माझ्या लक्षात आले की, मी नवीन स्वयंसूचना न बनवता जुन्या स्वभावदोषावरच स्वयंसूचना देत आहे. (‘एखाद्या स्वभावदोषावर काही कालावधीसाठी स्वयंसूचना दिल्याने तो उणावतो. अशा वेळी साधक नवीन स्वभावदोषावर स्वयंसूचना बनवून ती देतात.’ – संकलक) त्या वेळी श्रीकृष्णाने मला स्वयंसूचना देण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले, ‘नवीन स्वयंसूचना बनवल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प कार्यरत होतो. त्यामुळे त्यातील शब्दांमध्ये चैतन्य प्रवाहित होऊन त्या शब्दांभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होते. परिणामी नवीन स्वयंसूचनेमधून उत्साह आणि सात्त्विकता यांच्या लहरी प्रक्षेपित होतात. जेव्हा एखादा साधक नवीन स्वयंसूचना बनवत नाही, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प कार्यरत होत नाही. त्यामुळे त्या शब्दांमध्ये चैतन्य प्रवाहित होत नाही. परिणामी त्या शब्दांतील सकारात्मकतेचा र्हास होतो आणि मनाला जडपणा अन् आळस जाणवू लागतो. अशा प्रकारे आपण देत असलेल्या जुन्या स्वयंसूचनांचे कार्य खुंटते.’
– कु. मधुरा उदय देशपांडे, एशिया पॅसिफिक (१९.६.२०२३)

साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !