दिव्य अंशांसाठी सोमनाथ येथील त्रिवेणी संगमावरील वाळू आणली !
सनातन संस्थेला मिळाला श्री सोमनाथ मंदिराच्या शिखरावरील धर्मध्वज !

‘२ एप्रिल २०२६ ला हनुमान जयंतीच्या दिवशी सोमनाथ शिवलिंगाचे दिव्य अंशांचे आगमन भूकैलास कांचीपूरम्ला झाले. २९ एप्रिल २०२६ ला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ कांचीपूरम् येथे आले. त्याच दिवशी संध्याकाळी सोमनाथ शिवलिंगाच्या दिव्य अंशांचा अभिषेक चालू असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना शिव सोरटी सोमनाथहून वाळू आणण्याची प्रेरणा देत होता. त्यांना त्याचे कारण प्रारंभी कळत नव्हते. नंतर त्यांच्या लक्षात आले की, वाळू हे पृथ्वीतत्त्व आणि शिव म्हणजे आकाशतत्त्व ! म्हणजे वाळू ही शिवाची शक्ति आहे. शिव हा शक्तिविना अपुरा आणि शक्ति शिवाविना अपुरी आहे. त्यामुळे सनातन संस्थेला शिव आणि त्रिवेणी संगमाची वाळू अशा दोन्हीही ऊर्जा देण्यासाठी ते सनातनच्या आश्रमात रहावेत, अशी शिवाची इच्छा होती. सोमलिंग जेथे साक्षात् प्रगट झाले होते, त्याचा अंश त्या वाळूमध्ये होता. दुसर्या दिवशी रात्री आम्ही (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ, सद्गुरु डॉ. गाडगीळ आणि श्री. विनायक शानभाग) सोमनाथला विमानाने पोचलो.

सोमनाथ या ठिकाणी सतीचे उदर (पोट) पडले आहे. त्यामुळे ते पण तिथे एक जागृत शक्तिपीठ आहे. तशी देवीची शक्ती त्या वाळूमध्ये आहे. त्या शक्तिपीठाचे चंद्रभागा शक्तिपीठ असे नाव आहे. जेव्हा आपण शिवपिंडीला अभिषेक करतो, तेव्हा त्याच्या खाली पिंडिका असते. शिव मला सुचवत होता की, जेव्हा पिंडिका नसेल, तेव्हा शिवलिंगाला या चैतन्यमय वाळूमध्ये ठेवा. म्हणजे शिव आणि शक्ती एकत्रित रहातील. – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

रात्रीच सोमनाथ मंदिरात शिवाचे दर्शन घेतले. ‘सकाळी वाळूसाठी त्रिवेणी संगमाला जावे’, असे तेथील ज्येष्ठ पुजार्यांनी सुचवले. सोमनाथमध्ये सरस्वती, हिरण्या आणि कपिला, अशा ३ नद्यांचा संगम आहे. सोमनाथला जात असतांना श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना विचार आला, ‘सोमनाथ मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणारा धर्मध्वज आपल्याला मिळू शकतो का ?’ मंदिराचे माजी विश्वस्त श्री. पियुष पोफांडी यांना याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘सकाळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी एकत्रित बसून नवीन धर्मध्वजाचे पूजन करावे आणि नवीन ध्वज मंदिराला अर्पण करावा. असे केल्याने नवीन ध्वज मंदिरावर लावून आधीचा ध्वज यजमान दांपत्यांना दिला जातो.’’ त्याप्रमाणे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १ मे २०२६ या दिवशी सोमनाथ मंदिरात नवीन धर्मध्वजाचे पूजन केले. लगेच मंदिर व्यवस्थापनाने तो ध्वज मंदिराच्या शिखरावर लावला आणि आधीचा ध्वज त्यांनी आम्हाला दिला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने केवळ काही घंट्यांत कांचीपूरम् येथून सोमनाथला जाऊन धर्मध्वजाचे पूजन आणि वाळू आणणे करता आले.
– श्री. विनायक शानभाग, कांचीपूरम्, तमिळनाडू. (१२.५.२०२६)
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !