राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) !

नागपूर – ‘आम्हाला हिंदु राष्ट्र घोषित करायला सांगतात; पण आम्ही म्हणतो की, भारत हे हिंदु राष्ट्रच आहे, ते घोषित करण्याची आवश्यकताच नाही’, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काही दिवसांपूर्वी येथील एका कार्यक्रमात केले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी पोलिसांत लेखी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
सरसंघचालकांचे विधान हे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता, समानता, सर्वधर्मसमभाव आणि राष्ट्रीय एकात्मता या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. यातून समाजात धार्मिक ध्रुवीकरण अन् तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे’, असे तक्रारदाराने म्हटले आहे.
Nagpur: Complaint filed against the Sarsanghchalak of the RSS
Claim: Calling India a Hindu Rashtra is “anti-constitutional.”
The Congress party altered the original Constitution written by Dr. Babasaheb Ambedkar to insert the words 'Secularism' and 'Socialism.'
Does the… pic.twitter.com/O27Jy3HRdz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2026
तक्रारीत पुढे म्हटले आहे की,
१. भारताला एका विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्न राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांशी विसंगत असून स्वातंत्र्यलढ्यातील बलीदान, संविधानिक मूल्ये आणि लोकशाहीच्या मूलभूत आत्मा यांना धक्का पोहचवणारा आहे.
२. भारत हा विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचा देश असून राज्यघटनेने दिलेली ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ ही संकल्पना देशाच्या ऐक्याची आधारशिला आहे.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Khan Sir Coaching Firing : पाटलीपुत्र (बिहार) येथे प्रसिद्ध खान सर यांच्या शिकवणी वर्गावर आक्रमण