
१. पाश्चात्त्यांच्या संपर्कात वैदिक धर्म आणि संस्कृतीत इतके पालट झाले असले, तरी हिंदु समाजाने चिरस्थायी स्वरूपात काही अंगे सांभाळणे
‘गेल्या २०० वर्षांत पाश्चात्त्यांच्या संपर्कात वैदिक धर्म आणि संस्कृतीत इतके पालट झाले की, ‘तो जिवंत आहे, असे म्हणता यायचे नाही’, असा अर्वाचीन पुरोगामी हिंदूंचा आक्षेप आहे. आजच्या औद्योगिक संस्कृतीच्या भीषण आपत्तीतही वैदिक म्हणजे, हिंदु समाजाने चिरस्थायी स्वरूपात काही अंगे सांभाळली आहेतच. आतला माणूस कायम आहे. पोशाख तेवढा पालटलेला आहे. पोशाख पालटला की, ‘माणूस मरतो का ?’
२. धर्मनिरपेक्ष हिंदूला स्वतःच्या जिवंतपणाची निश्चिती नसतांना त्यांना हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर बोलण्याचा अधिकार नसणे
धर्मनिरपेक्ष वा पुरोगामी हिंदु अशा अर्धवटाला ‘हिंदु समाज मेला आहे’, असे वाटते. तसे उघड न बोलता त्या हिंदु समाजाच्या नावाखाली त्यांना हवी ती सुबत्ता निर्माण करायची असते. ‘न हिन्दुर्न यवनः ।’ म्हणजे ‘हिंदूही नाही आणि यवनही नाही’, अशा या निधर्मी हिंदूला स्वतःच्या जिवंतपणाची निश्चिती नाही. अशांना हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर तोंड उघडण्याचा काय अधिकार ? आणि लोकांनी तरी या मृत पिंडाचे का ऐकावे ?’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (मासिक ‘घनगर्जित’, मे २०२२)
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !