Prakash Raj : रामायणाविषयी आक्षेपार्ह विधान करणारे अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटला प्रविष्ट (दाखल)

अभिनेते प्रकाश राज

बेंगळुरू (कर्नाटक) – अभिनेते प्रकाश राज यांनी रामायणाची कथा वेगळ्या प्रकारे सांगितल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटला प्रविष्ट (दाखल) करण्यात आला आहे.

काय म्हणाले प्रकाश राज ?

एका मंचावर बोलतांना प्रकाश राज म्हणाले होते की, ‘राम, लक्ष्मण आणि सीता जेव्हा दक्षिण भारतात येतात, तेव्हा लक्ष्मणाला भूक लागते. तिथे असलेल्या फळांच्या बागेत जाऊन ‘फळे खाऊया’, असे लक्ष्मण म्हणतो. सर्व जण फळे खातात. तेव्हा तिथे आलेली शूर्पणखा तिचा भाऊ रावणाला सांगते की, ‘कुणीतरी फळे खात आहे.’ त्यावर रावण म्हणतो की, ‘त्यांना भूक लागली असेल, खाऊ दे.’ पुढे रावण पैसे मागतो; पण राम ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे सांगतो. तेव्हा रावण म्हणतो की, ‘मी २० टक्के सवलत  देतो.’ पैसेच नाहीत म्हटल्यावर सवलत देऊन काय उपयोग ? त्याचप्रमाणे आमच्यावर हिंदी लादू नका, इथे येऊन तुम्ही मल्याळम् शिका. आम्ही गोमांस उत्सव (बीफ फेस्ट) साजरा करू.’

संपादकीय भूमिका

अशांना आजन्म कारागृहात डांबण्याची शिक्षा झाली पाहिजे !