
‘अध्यात्मात सेवकभावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हनुमानाने युगानुयुगे दास्यभक्तीचा सर्वाेत्कृष्ट आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. तो आपल्या प्रभुकरता (श्रीरामाकरता) प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असायचा. श्रीरामाच्या सेवेपुढे त्याला सर्वकाही कवडीमोल वाटायचे.
सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !
‘साधकांच्या जीवनाचे प्राधान्य हे केवळ ‘भगवंत आणि त्याची भक्ती करणे’, एवढेच असायला हवे !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
साधकहो, प्रभु श्रीरामचंद्रांच्या रामराज्य स्थापनेच्या कार्याशी पूर्णतः एकरूप झालेल्या हनुमंताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात स्वतःला समर्पित करा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.३.२०२६)
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
२९.४.२०२६ या दिवसापासून साधकाला स्वतःच्या आणि सेवेच्या संदर्भात जाणवत असलेले पालट !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !