|

नवी मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ २९ मार्चपासून देशातील ३० शहरांना जोडले जाणार आहे. यापूर्वी या विमानतळावरून १६ शहरांमध्ये दिवसा विमानप्रवास करता येत होता, आता २९ मार्चपासून या विमानतळावरून प्रवाशांना देशांतील ४६ शहरांत जाता येणार आहे. विमानतळ आस्थापनाने २९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीत लागू झालेले वेळापत्रक घोषित केले आहे. या विमानतळावरून आता प्रत्येक आठवड्याला अनुमाने १ सहस्र ९२ उड्डाणे केली जातील, तर प्रतिदिन सरासरी १५६ उड्डाणे होतील.
विमानतळावरून देहलीला प्रतिदिन ९ उड्डाणे, गोवा येथे ७, बेंगळुरू येथे ६ आणि कोच्चि येथे ५ उड्डाणे नियोजित आहेत. यांसह भाग्यनगर (हैदराबाद), कोलकाता, लक्ष्मणपुरी (लखनौ), वाराणसी आणि इंदूर या शहरांमध्ये विमानप्रवास करता येईल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस ही ३ विमान आस्थापने अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी पर्यायांची संख्या वाढणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून कोणत्या ३० शहरांमध्ये जाता येणार ?आग्रा, छत्रपती संभाजीनगर, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा (दाबोलीम्), गोरखपूर, हिंडन, राजकोट (हिरा सर), हुब्बळ्ळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपूरम् आणि विशाखापट्टणम् |
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !