|

नवी मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ २९ मार्चपासून देशातील ३० शहरांना जोडले जाणार आहे. यापूर्वी या विमानतळावरून १६ शहरांमध्ये दिवसा विमानप्रवास करता येत होता, आता २९ मार्चपासून या विमानतळावरून प्रवाशांना देशांतील ४६ शहरांत जाता येणार आहे. विमानतळ आस्थापनाने २९ मार्च ते २४ ऑक्टोबर या कालावधीत लागू झालेले वेळापत्रक घोषित केले आहे. या विमानतळावरून आता प्रत्येक आठवड्याला अनुमाने १ सहस्र ९२ उड्डाणे केली जातील, तर प्रतिदिन सरासरी १५६ उड्डाणे होतील.
विमानतळावरून देहलीला प्रतिदिन ९ उड्डाणे, गोवा येथे ७, बेंगळुरू येथे ६ आणि कोच्चि येथे ५ उड्डाणे नियोजित आहेत. यांसह भाग्यनगर (हैदराबाद), कोलकाता, लक्ष्मणपुरी (लखनौ), वाराणसी आणि इंदूर या शहरांमध्ये विमानप्रवास करता येईल. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्सप्रेस ही ३ विमान आस्थापने अतिरिक्त उड्डाणे चालवणार आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी पर्यायांची संख्या वाढणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून कोणत्या ३० शहरांमध्ये जाता येणार ?आग्रा, छत्रपती संभाजीनगर, अयोध्या, बागडोगरा, बरेली, बेळगाव, भावनगर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, दिऊ, दुर्गापूर, गोवा (दाबोलीम्), गोरखपूर, हिंडन, राजकोट (हिरा सर), हुब्बळ्ळी, जबलपूर, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर, श्रीनगर, तिरुपती, तिरुवनंतपूरम् आणि विशाखापट्टणम् |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !