चित्रपटसृष्टीमधील पूर्वी असलेल्या जिहादी-साम्यवादी युतीचे गेले ते दिवस !

श्री. अभिजित जोग

वर्ष २०१४ पूर्वी चित्रपटसृष्टी किती किती स्वच्छ आणि कलात्मक होती नाही ? ‘प्रोपोगंडा’ (प्रचार) वगैरे सगळे चालू झाले, ते वाईट मोदी आल्यानंतरच !

आता वर्ष १९८३ चा ‘कूली’ हा कलात्मक चित्रपटच बघा ना ! ‘व्हिलन’ (खलनायक) असलेल्या अभिनेते सुरेश ओबेरॉयच्या हातात त्रिशूळ, तर हिरो (नायक) अभिनेते अमिताभच्या हातात साम्यवाद्यांचा विळा आणि हातोडा. किती ‘सटल’ (समजायला कठीण) आणि ‘सिंबॉलिक’ (प्रतिकात्मक) नाही ? यात आहे कुठे ‘प्रोपोगंडा’ ? शक्यच नाही. तेव्हा सारे कसे छान छान होते !

नसीरुद्दीन शाह वगैरे ‘थोर्थोर’ (पुष्कळ मोठी) मंडळी म्हणतात, ते खरेच आहे. ‘This is not the India I grew up in.’ (मी ज्या भारतात वाढलो, तो हा भारत नाही.) ‘आमच्या’ भारतातील चित्रपटांवर राज्य होते, ते लोकशाही, ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मीवाद) आणि आविष्कारस्वातंत्र्य यांचे रक्षणकर्ते असलेल्या जिहादी-साम्यवादी युतीचे ! गेले ते दिवस !

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.