यापूर्वीच्या १ सहस्र २३७ घुसखोरांपैकी किती नावे शिधापत्रिकेत आहेत, याची माहिती नाही !

मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने आणखी ४०० बांगलादेशी घुसखोरांच्या नावांची सूची अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला पाठवली आहे. या घुसखोरांची नावे शिधापत्रिकेवर आहेत का, याची पडताळणी करून असल्यास ती वगळण्यात यावीत, यासाठी ही नावे विभागाला पाठवण्यात आली आहेत.
आतंकवादविरोधी पथकाने मे २०२५ मध्ये १ सहस्र २३७ बांगलादेशी घुसखोरांची नावे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे पाठवली आहेत; परंतु त्यामधील किती नावे शिधापत्रिकेत आहेत. असल्यास ती वगळली का ? याविषयी राज्यातील एकाही जिल्ह्यातून माहिती अद्याप विभागाला माहिती देण्यात आलेली नाही.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !