सरकारला आधीच ठाऊक होते, तर एल्.पी.जी.ची व्यवस्था का केली नाही ! – मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस अध्यक्ष

राज्यसभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रश्न

मल्लिकार्जुन खर्गे

नवी देहली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये १६ मार्च या दिवशी राज्यसभेत एल्.पी.जी. सिलिंडवरवरून विरोधकांनी प्रश्न विचारून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत सांगितले की, पेट्रोलियम मंत्र्यांनी लोकसभेत दावा केला की, एल्.पी.जी.ची कोणतीही कमतरता नाही; परंतु भूमीवरील वास्तव सरकारी दाव्यांना खोटे ठरवत आहे. जर सरकारने वेळेत व्यवस्था केली असती, तर परिस्थिती इतकी वाईट झाली नसती.

एल्.पी.जी.च्या तुटवड्यावरून विरोधक अनावश्यक भीती पसरवत आहेत ! – कंगना रणावत

कंगना रणावत

एल्.पी.जी.च्या तुटवड्यांच्या वृत्तांवरून विरोधकांनी केलेल्या आंदोलनांना उत्तर देतांना भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी म्हटले की, विरोधक देशभरात अनावश्यक भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी देशातील जनतेला आवाहन करते की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा.